चार दिवस उलटूनही गाळ उचलण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
निलेश मोरे
मुंबई : पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून नाले, गटारे साफ केली जातात. यंदा देशात कोरोनाचे सावट असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरू नये यासाठी पालिकेची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. शौचालयाचे सॅनिटायझर , साठलेला ओला व सुका कचऱ्याचे विघटन , नाले सफाई पालिकेकडून केली जात आहे. मात्र काही झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी पालिकेकडून करण्यात आलेल्या नाले सफाईतील गाळ आठवडा उलटूनही असाच पडून राहत असल्याने परिसरातील नागरिकाना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आता स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घाटकोपर येथे एन वार्ड पालिकेकडून माधव बाग , जगदुशा नगर , जय महाराष्ट्र प्रगती मंडळ येथे नाले सफाई करण्यात आली आहे. या नाल्यातील ओला गाळ असाच रस्त्यावर पडून आहे. चार दिवसांपासून हा गाळ उचलण्यात आला नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सध्या मुंबईत पावसाचे सावट असल्याचे चित्र दिसते आहे. वरुणराजा आगमनाची केव्हाही सुरुवात करू शकतो पालिकेने लवकरात लवकर हा गाळ उचलून रस्ता स्वच्छ करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज पनवेल :…
देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल : भाजपचे नगरसेवक तथा…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा…