प्रिय रमाई,
तू नसतीस तर आज कुठे असतो आम्ही ? कल्पनाही करवत नाही, तू जीवापाड सोसलेस माऊली! त्यागाची परिभाषा तू आहेस. गावकुसाबाहेरील लाखो मुक्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा सन्मान तू अपार दुःख सोसल्यामुळेच मिळालाय ह्याची जाणीव पावलोपावली आम्हास होते. प्रज्ञासूर्याच्या आयुष्यात तू नसतीस तर ……..कल्पनाच नको वाटते…..थरकाप उडतो, घशाला कोरड पडते, श्वासही अडकतो, अंधारून येते डोळ्यासमोर भर दिवसाही!
तू नसत्या खाल्ल्या खस्ता तर युगायुगांचा काळाकुट्ट अंधार नसताच झाला नामशेष, शिळ्या तुकड्यांवर जगत वळवळलो असतो वेशीबाहेरच्या अंधारल्या दुर्लक्षित शेणाच्या पवात…..हक्क-अधिकार काय असतात? स्वाभिमान, आत्मभान कशाशी खातात? नसतंच कळलं कधी…. पाटीपुस्तकाने आयुष्य अंतर्बाह्य बदललं नसतं. गावा-शहरात ‘राजगृह’ नसते उभे राहिले दिमाखात, वातानुकूलित चारचाकीत ऐटीत बसून कसे फिरलो असतो? वास्तव मांडण्याची पोटतिडीक कशी जागृत झाली असती? मोठ्या पदावर मानाने मिरवलो नसतो की कायद्याची भाषा बोलू शकलो नसतो.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.